| |
संत
नामदेव महाराज यांची अभंगांची गाथा
|
|
|
|
| |
भाग
पहिला - मंगलाचरण अभंग |
| ८८. |
मध्याह्नकाळी मग हरीसी घेऊन । करीतसे भोजन यशोदा तें ॥१॥ भोजन करूनि पलंगी निजत । श्रीकृष्णासी घेत पुढें तेव्हां ॥२॥ यशोदेसी सुखनिद्रा हो लागली । राधिका ते गेली यमुनेसी ॥३॥ नेत्रासीं पदर लावोनि रडत । अंतरी अनंत आठवोनी ॥४॥ करुणाशब्द तिचा ऐकोनी श्रवणीं । उठला चक्रपाणी तेथोनियां ॥५॥ जावोनियां राधा धरिली पदरीं । तिजलागीं हरि समजावीत ॥६॥ संसारासी माझ्या पडियेलें पाणी । ऐसें चक्रपाणी तुवां केलें ॥७॥ इकडे यशोदा ती जागी जंव होत । हरीसी धुंडीत तयेवेळीं ॥८॥ एखादी हा कळी घेऊन येईल आतां । पहातसे माता चहूंकडे ॥९॥ पाउलाचा मार्ग चालिली काढीत । पावली त्वरीत यमुनातीरां ॥१०॥ राधा तयेवेळी म्हणे रे अनंता । पैल तुझी माता येत असे ॥११॥ मातेसी देखूनि गडबडां लोळत । यशोदा ते घेत कडेवरी ॥१२॥ मातेसी म्हणत चोरोनि कंदुक । घेउनियां देख आली तेथें ॥१३॥ माता म्हणे कां वो यासी रडविसी । चेंडू तूं हरिसी देई वेगीं ॥१४॥ मा मीसें हा मजवरी घेई गे तुफान । मजपाशी जाणा चेंडू नाही ॥१५॥ कृष्ण म्हणे माते झाडा घेई आतां । कंदूक तत्त्वता निघेल पैं ॥१६॥ वस्त्र जवं झाडीत राधा तयेवेळीं । पडियेला भूतळीं कंदूक तो ॥१७॥ ऐसें देखोनिया लज्जित जहाली । हांसत वनमाळी नामा म्हणे ॥१८॥
|
|
|
| |
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 |
|